शिंदे सरकारची मोठी घोषणा..! राज्यातील सर्व शेतकऱ्यांना 8 दिवसात पिक विम्याची रक्कम मिळणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Insurance: नमस्कार शेतकरी मित्रांनो, नुकत्याच झालेल्या पालकमंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठकीत पिक विमा कंपन्यांचे अधिकाऱ्यांची झालेली खरडपट्टी ही त्यांच्या शेतकरी विरोधी वृत्तीचीच प्रतिक्रिया होती. कमी पावसामुळे खरीप पिकाचे प्रचंड नुकसान झाले असताना, विमा कंपनी शेतकऱ्यांना विमा मदत देण्यास न करण्याचा प्रयत्न केल्याने पालकमंत्री भुसे यांनी त्यांच्यावर रोखठोक हल्ला चढविला आहे.

पिक विमा साठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कापूस उत्पादक सह अन्य शेतकऱ्यांनाही विमा मदत अपुरी मिळालेली आहे. या बैठकीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केवळ 105 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली असल्याचे उघडकीस आले. आतापर्यंत फक्त 57 कोटी रुपये वाटप करण्यात आलेले आहेत. कापूस उत्पादकासह इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना विमा कंपन्या शेतकऱ्यांना विमा मदतीपासून वंचित ठेवत आहेत.

आनंदाची बातमी, सोने झाले 5400 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्य 10 ग्रॅम सोन्याची किंमत

विमा कंपन्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा

पालकमंत्री भुसे यांनी स्पष्ट शब्द सांगितले की जर तुम्ही पुढील आठ दिवसात शेतकऱ्यांना विमा मदत दिली नाही तर विमा कंपनी विरुद्ध थेट गुन्हा दाखल करण्यात येईल. यासाठी शेतकऱ्यांसोबत विमा कंपन्यांच्या कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा पालकमंत्री यांनी दिला. Crop Insurance

विमा कंपनीतून गेल्या दहा वर्षात विमा कंपनीने कोणते योगदान दिले याची चौकशी व्हावी अशी मागणी पालकमंत्री भुसे यांनी केली आहे. कंपनीने केवळ आपला फायदा पाहिला असून शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.

राज्यात होणार जोरदार अवकाळी पाऊस..! येत्या 7-11 मे दरम्यान वादळवाऱ्यासोबत बरसणार पाऊस

शेतकऱ्याची अवस्था

महाराष्ट्रातील शेतकऱ्याची अवस्था अत्यंत बिकट असल्याचे नमूद यावेळी पालकमंत्री यांनी केले. त्यांच्या मते विमा अधिकारी शेतकऱ्यांचा धरणालाच भेट देत नाहीत. म्हणून त्यांना शेतकऱ्यांची वास्तविक परिस्थिती समजत नाही. त्यामुळे कंपन्या शेतकऱ्यावर अन्याय करतात असा आरोप त्यांनी यावेळी विमा कंपनीवर केला आहे.

शेतकरी हा देशाचा कणा असून त्याच्याविना आपण जगू शकत नाही. आपला भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, पण खरंच आपला देश हा कृषिप्रधान आहे का? असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला. पिक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी आखण्यात आलेली आहे. परंतु कंपन्यांच्या दुर्लक्षामुळे योजनेचा मूळ उद्देश साध्य होत नसल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारला पुढाकार घ्यावा लागेल अशी अपेक्षा आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

5 thoughts on “शिंदे सरकारची मोठी घोषणा..! राज्यातील सर्व शेतकऱ्यांना 8 दिवसात पिक विम्याची रक्कम मिळणार”

Leave a Comment

error: Content is protected !!